
पहलगाम पर्यटक हल्लाप्रकरणी दोषींना तात्काळ शोधून, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघाकडून तहसीलदार उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले आहे. तर यावेळी उरण तालुक्यामध्ये असणारे बेकायदेशीर आणि देशाला धोका निर्माण करणाऱ्या भंगारवाल्यांविरोधात कारवाई होण्यासाठी चर्चा केली.
काश्मीर, पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याप्रकारणी देशभरात संतापाचे वातावरण पहायला मिळत असून, विविध प्रकारे या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. दहशतवादाला धर्म नसतो असे आपण नेहमी बोलतो. मात्र या हल्ल्यामध्ये दहशवादाने आपला धर्म जगासमोर आणला आहे. येथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाला धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या. तर यामध्ये २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच हिंदू पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी धडापडणाऱ्या काश्मिरी मुस्लिम व्यावसाईकांना देखील आपला जीव गमाववा लागला आहे. या सर्व प्रकारात आतंकवादाच्या धर्माचा पर्दा फार्ष झाला आहे. या घटनेचा निषेध करत दोषी अतिरेकी आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होण्यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघाकडून उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. तर यावेळी संवेदनशील उरण तालुका त्यासोबत रेड अलर्टवर असणारा जिल्ह्याचा समुद्र किनारा यावर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील संशईत नागरिक, बेकायदेशीरपणे निर्माण झालेले भंगाराचे अड्डे, देशाला धोकादायक ठरणारे भंगारवाले यांच्यावर देखील नजर ठेऊन कारवाई होणे गरजेचे असल्याचे, उपस्थित पात्रकारांनी यावेळी अधोरेखित केले आहे. त्यामुळे देशावर घोंगवत असणाऱ्या युद्धस्थितीमध्ये देशाच्या आतली पारिस्थिती आणि सुरक्षा आबादीत राहण्यासाठी शासकीय अधिकारी आपली भूमिका नेटाने बाजावणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
